Skip to content
9685980b-f323-4b1b-813d-4e0eb430b6f7-removebg-preview

श्री.भैरवनाथ शिक्षण व सेवा-भावी संस्था

Dr. S. P Patil Nursing College, Korochi- Ichlakaranji

Menu

म्हणूनच कुटुंब बालकाच्या संस्काराचा पाया आहे.मुलांवर परिसरातूनही सहज संस्कार घडत असतात. परिसरातील वस्ती, गाव, संस्कृती यामधून चांगल्या-वाईट गोष्टी तो शिकतो. लहान असल्याने चांगले काय, वाईट काय याची जाणीव त्याला नसते. म्हणून घरातील व्यक्तींचे त्याच्यावर लक्ष हवे. मुले बाहेरील घडलेली घटना कुटुंबातील व्यक्तीना सांगत असतात त्यावेळी तो जे काही सांगत आहे हे आपण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून तो जे काही सांगत आहे हे आपण ऐकून त्यावर चांगले काय, वाईट काय याचा उपदेश समजपूर्वक न रागावता समजून सांगितले तर संस्काराची पालवी फुटायला नक्कीच सुरुवात होईल.संस्काराचे मंदिर म्हणजे शाळा. मुल आईचे बोट धरून या मंदिरात पाउल ठेवतात तेव्हा खऱ्या अर्थाने संस्कार व शिक्षण दोन्ही एकत्र सुरु होते.आता मूल विद्यार्थी झालेले असते. सरस्वतीच्या मंदिरात गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराचा वटवृक्ष बहरायला सुरुवात होते. शिस्त, आज्ञाधारकपणा देशप्रेम, बंधुभाव, संवेदनशील, धीटपणा या गुणांचा संगम होतो गुरुजनांविषयी आपुलकी आत्मियता वाटू लागते. शिक्षणातून सहज संस्कार राबविले जातात, परिपाठासारख्या उपक्रमात्न राष्ट्रीय मुल्यांचा शिडकावा विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो. गाणी, गप्पा, गोष्टी, कविता, विविध राष्ट्रपुरुषांची जयंती, थोरांचे बोल, राष्ट्रीय सण, विविध शालेय उपक्रम, खेळ, कार्यानुभव चित्रकला या सर्वांचा परिपाक होऊन संस्काराची मुळे घड़ रोवतात. मुले शाळेतील घटना, प्रसंग गुरुजींनी काय शिकवले. अभ्यास कोणता विला सर्व काही पालकांना सांगत असतात. दिवसभराचा वृतांत कथन करतात. अशा वेळी आपण मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. मुले काय सांगतात ते ऐकून घेतले पाहिजे. शिक्षकांविषयी आदराची भावना मुलांच्या मनात कशी निर्माण होईल यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न करायला हवा. मुलाची प्रगती, वागणुक याविषयी गुरुजनाची भेट घेऊन जाणून घेतले पाहिजे.

संस्कार आज काळाची गरज आहे. बालपणी जिजामातेने संस्काराची बीजे रुजल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. रयतेचे स्वराज्य निर्माण झाले. श्यामच्या आईने श्यामवर उत्तम संस्कार केले. मुल्यांची पाखरण श्यामवर केली म्हणून महाराष्ट्राला संवेदनशील मनाचे साने गुरुजी मिळाले. श्यामच्या आईने श्यामवर केलेले संस्कार गोष्टीरूपात आदर्श शिक्षक साने गुरुर्जीनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले.

पालकांना संस्काराची जी शिदोरी आपल्या बाडवडीलांकडून मिळाली ती शिदोरी सोडण्याची वेळ आली आहे. आपण पालक म्हणून वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर सन्मान केला तर मुले तुमचे अनुकरण करतील. ते सुद्धा विनयशील होतील व वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर सन्मान करतील. त्यासाठी संस्काराचा शोध घेण्याची गरज पडणार नाही. संस्काराचे क्लास लावून मिळणाऱ्या विकतच्या संस्कारापेक्षा रोजच्या वागणुकीतून मिळणारी कुटुंबातील, व्यवहारातील, शिकवणूक आचार विचार, गुण अवगुण हे ओळखता आले तरी मुलांवर संस्कार घडले असे म्हणता येईल.