डॉ.सौ.शुभांगी पाटील
President's Message
आज सर्व शाळा व महाविद्यालयातून दिले जाणारे शिक्षण हे परीक्षा पध्दतीतून मिळणाऱ्या गुणवत्तेवर आधारित असे आहे. ही गुणवत्ता विद्यार्थ्यास त्याचा शैक्षणिक प्रवास सुखकर व्हावा आणि एखाद्या चांगल्या नोकरीची संधी मिळावी एवढी सिमित आहे. ज्ञानमंदिरात मिळालेले हे शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आणि जीवनात सर्व पातळीवर यशस्वी होण्यास कमी पडते.
सृजनशीलतेसारखे गुण केवळ पुस्तकातच राहण्याची शक्यता बळावते. शिक्षाय फक्त वर्गात आणि पुस्तकातच शिक्षण असल्याचा समज विद्यार्थ्यांच्या मनात वाढीस लागतो. अन् विद्यार्थी संस्कारक्षम जीवन शिक्षणापासून दूर जातो. जगाचे भवितव्य शिक्षणाशी निगडीत आहे. नवनवीन आव्हाने पेलण्याची ताकद शिक्षणात हवी. याचे भान ठेवून सर्व शाळांतून नवनिर्माणाची क्षमता असणारा चिकित्सक वृत्तीचा, जिज्ञासू, अभ्यासू, विज्ञाननिष्ठ, स्वावलंबी, आत्मविश्वासू, संस्कारक्षम, कणखर बाण्याचा, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन मातृभूमीचा उपासक असणारा डोळस व सूजाण विद्यार्थी घडविणारे शिक्षण आज अपेक्षित आहे.